शासकीय योजना


ग्रामपंचायतीशी संबधित महत्वाच्या शासकीय योजनांची माहिती
रमाई आवास योजना
थोडक्यात माहिती : रमाई आवास योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे, जी राज्यातील अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध घटकांतील व्यक्ती/कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी राबविली जाते.
लाभार्थी पात्रता : 1) लाभार्थी अनुसूचित जाती (SC) किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
2) वार्षिक उत्पन्न ₹1,20,000 /- पर्यंत
3) लाभार्थी बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
4) यापूर्वी शासनाच्या कोणत्याही घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
कागदपत्रे:
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र
जातीचा दाखला
उत्पन्नाचा दाखला
बँक पासबुक झेरॉक्स
जॉबकार्ड
जागेची कागदपत्रे
लाभाचे स्वरुप:
1,20,000 + मनरेगा मजूरी + शौचालय अनुदान
निवड प्रक्रिया : प्राप्त उद्दिष्ठानुसार लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेत केली जाते. अंतिम निवड मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून केली जाते.
प्रधानमंत्री आवास योजना
थोडक्यात माहिती : ही घरकुलाची केंद्र पुरस्कृत योजना असून पूर्वीच्या इंदिरा आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात या योजनेची अंमलबजावणी सन २०१६-१७ या वित्तीय वर्षांपासून करण्यात येत आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य हिस्सा अनुक्रमे ६०:४० इतका आहे.
लाभार्थी पात्रता : 2 लक्ष रुपये पर्यंत
कागदपत्रे:
आधार कार्ड बॅक पासबुक झेरॉक्स जागेची कागदपत्रे जॉबकार्ड
लाभाचे स्वरुप:
2 लक्ष रुपये पर्यंत
निवड प्रक्रिया : लाभार्थ्यांची निवड सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण-२०११ मधील माहितीच्या आधारे करण्यात येते
सामान्य प्रश्न
ग्रामपंचायत काय आहे?
ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
आंदूर्ले ग्रामपंचायतचे कार्य?
ग्रामपंचायत गावातील विकास, स्वच्छता आणि पाणीपुरवठा सांभाळते.
ग्रामपंचायतशी संपर्क कसा साधावा?
आपण ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊ शकता किंवा दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करू शकता.
गावातील समस्या कशा नोंदवायच्या?
तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार नोंदवू शकता.
ग्रामपंचायतची बैठक कधी होते?
बैठकीची तारीख ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.
ग्रामपंचायतमध्ये सदस्य कसे निवडले जातात?
सदस्य गावातील लोकांच्या मतदानाने निवडले जातात.
